ब्रेकिंगमहाराष्ट्र

महाराष्ट्रातील अग्रगण्य बँका आणि पतसंस्थापैकी समताच्या ठेवी सुरक्षिततेत विक्रमी वाढ- श्री विद्याधर अनास्कर; राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षांची समतास सदिच्छा भेट

समता वार्ता कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

महाराष्ट्रातील अग्रगण्य बँका आणि पतसंस्थापैकी समताच्या ठेवी सुरक्षिततेत विक्रमी वाढ-श्री विद्याधर अनास्कर

राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षांची समतास सदिच्छा भेट

कोपरगाव : सहकारातून समृध्दी कडे या प्रमाणे काकांच्या जीवनातच सहकार असून ते सहकार जगतात त्यांचे जीवन समृध्द आहे आणि यातून त्यांना मानसिक समाधान ही मिळते या समृद्ध जीवन जगण्याच्या कलेतून समता पतसंस्थेला पण आर्थिकदृष्ट्या समृद्ध बनविले असून समताच्या नावातच समानता असल्यामुळे ग्राहकांना पत निर्माण करून देणारी पतसंस्था म्हणून ओळख निर्माण केली असून आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सभासद, ग्राहकांना आदर्शवत सेवा देत समताच्या ठेवीदारांच्या ठेवी समता लिक्विडीटी बेस्ड प्रोटेक्शन फंड हे समताचे एक अभेद्य सुरक्षा कवच आहे यामुळे समताच्या ९९.०९℅ ठेवी सुरक्षित असून महाराष्ट्रातील अग्रगण्य बँका आणि पतसंस्थापैकी समताची ठेवी सुरक्षिततेबाबत विक्रमी वाढ आहे.असे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष श्री विद्याधर अनास्कर यांनी काढले.

समता नागरी सहकारी पतसंस्थेस १८ डिसेंबर २०२१ रोजी महाराष्ट्र राज्य सहकार परिषद,महाराष्ट्र राज्य सहकारी बँक,महाराष्ट्र अर्बन बॅंक्स फेडरेशन चे अध्यक्ष श्री विद्याधर अनास्कर यांनी सदिच्छा भेट दिली. स्व.मोहनलाल आनंदराम झंवर सभागृहात त्यांचा यथोचित सन्मान करून सत्कार करण्यात आला.प्रसंगी ते बोलत होते.संस्थेचे संचालक श्री संदीप कोयटे यांनी चित्रफितीच्या माध्यमातून समता लिक्विडीटी बेस्ड प्रोटेक्शन फंडा विषयी सविस्तर माहिती दिली.

तसेच ते पुढे म्हणाले की,कितीही मोठे व्हा पण बँका बनू नका तर ज्यांना पत नाही त्यांना कर्ज देऊन पत निर्माण करून देणाऱ्या पतसंस्था बना कारण आज पतसंस्थानीच सामान्य व गरजू नागरिकांना कर्ज देऊन आर्थिक स्थिरता प्राप्त करून दिली आहे यात समताने देखील नावलौकिक मिळविला असून धनादेश पुस्तक (चेक बुक) ची सुविधा ग्राहकांना देण्याचा प्रयत्न केला तर समताच्या प्रगतीत अजून एक नवीन पाऊल पडेल.

प्रसंगी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त करताना संस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे म्हणाले की,सहकार चळवळीत सर्वोच्च स्थानी असणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे श्री विद्याधर अनास्कर.स्वतःजवळ राज्यमंत्री पदाचा दर्जा असताना देखील कोणत्याही प्रकारचा बडेजाव न करता अडचणीत असणाऱ्या बँकांना सुखरूप बाहेर काढणे ही कला यांच्याकडे असून ते बँका, पतसंस्थांना मार्गदर्शन करत असतात त्यामुळे सहकारातील आदर्श व्यक्तिमत्वाने समताची सदिच्छा भेट घेणे ही आम्हा समता परिवारासाठी आभिमानाची बाब आहे.
तसेच अहमदनगर जिल्ह्यातील पतसंस्थांनी एकत्र येऊन स्वतःचे संरक्षण स्वतः करता यावे त्यासाठी अहमदनगर जिल्हा स्थैर्य निधीची स्थापना करून त्या अंतर्गत लिक्विडीटी बेस्ड प्रोटेक्शन फंड योजना अंमलात आणली आहे त्यामुळे समता पतसंस्था आज ९९.०९℅ ठेवी सुरक्षित आहे.

प्रारंभी श्री विद्याधर अनास्कर यांनी समता नागरी सहकारी पतसंस्थेचे मुख्य कार्यालयाला भेट देऊन पतसंस्थेच्या दैनंदिन कामकाजाची माहिती जाणून घेत फॉरेन्सिक ऑडीट कंट्रोल रूम, व्हॉऊचरलेस पद्धत, समता क्यु.आर.कोड ,ऑनलाईन समता रिकव्हरी पॅटर्न, सोनेतारण विभागाची कार्यप्रणाली विषयी संस्थेचे संचालक श्री संदीप कोयटे यांनी सविस्तर माहिती दिली,

तर समताच्या सहकार उद्योग मंदिराला भेट देत सहकार मंदिरातील अगरबत्ती,कापूर,समई वाती,वस्त्र निर्मिती अशा विविध सुरु असलेल्या उत्पादनाविषयी समता महिला बचत गटाच्या कु रेणुका मुन्शी यांनी सविस्तर माहिती दिली समता पतसंस्थेचे आधुनिक तंत्रज्ञान,विविध योजना,उपक्रम,ग्राहकांना दिली जाणारी तत्पर सेवा आणि सहकार उद्योग मंदिरातील गृहउद्योगांची माहिती जाणून घेत, कौतुक करत शुभेच्छा दिल्या.

यावेळी संस्थेचे जेष्ठ संचालक श्री रामचंद्र बागरेचा,श्री जितुभाई शहा यांच्या हस्ते समता महिला बचत गटाच्या महिलांनी कलाकुसर करून अगरबत्ती व कापूर एकत्र बांधून तयार केलेला गुच्छ देऊन सन्मान करत सत्कार करण्यात आला.तर ठोळे उद्योग समुहाचे संस्थापक श्री कैलास ठोळे यांनी राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष श्री विद्याधर अनास्कर, अहमदनगर जिल्हा स्थैर्य निधी आणि साईबाबा संस्थान चे विश्वस्त श्री सुरेश वाबळे,राज्य पतसंस्था फेडरेशन आणि समता पतसंस्थेचे अध्यक्ष काका कोयटे यांचा सत्कार केला.

प्रसंगी श्री कैलास ठोळे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की,ज्या प्रमाणे काका सहकार चळवळीसाठी रात्रं दिवस प्रवास करतात एवढी ऊर्जा त्यांच्यात सहकारामुळेच आहे त्यामुळे काका सहकारातील तरुणांचे आदर्श असून समतात देखील ते वेगवेगळ्या कल्पना मांडत असतात आणि त्याचे पदाधिकारी,अधिकारी,कर्मचारी अंमलात आणत असतात.

प्रसंगी अहमदनगर जिल्हा स्थैर्य निधीचे अध्यक्ष श्री सुरेश वाबळे कोपरगाव पीपल्स बँकेचे संचालक आणि ठोळे उद्योग समुहाचे संस्थापक श्री कैलास ठोळे, प्रसिद्ध कायदे तज्ञ श्री श्याम क्षीरसागर,संस्थेचे जेष्ठ संचालक सर्वश्री श्री रामचंद्र बागरेचा,श्री अरविंद पटेल,जितुभाई शहा,कचरू मोकळ,गुलशन होडे,संदीप कोयटे,किरण शिरोडे,जनरल मॅनेजर श्री सचिन भट्टड, मुख्य कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार संचालक श्री संदीप कोयटे यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे