थकबाकीदार पाटणी बंधू यांना कोर्टाचे आदेश…
कोपरगाव : येथील समता नागरी सहकारी पतसंस्था मर्या, कोपरगांव यांचेकडुन मे पाटणी फर्म अँड ॲग्रो टुरिझम करिता भागीदार अनिल दिलीप कुमार पाटणी आणि अतुल दिलीप कुमार पाटणी यांना दिलेल्या कर्जाची परत फेड व्हावी म्हणून आरोपी पाटणी बंधू यांनी त्यांच्या भागीदारी फर्मचे दोन चेक समता पतसंस्थेला दिले होते.
संस्थेला दिलेले सदर चेक वटले नाही म्हणून आरोपीं विरुद्ध कोपरगाव न्यायालयात समता पतसंस्थेतर्फे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट कलम १३८ अन्वये मुख्य कार्यालयाचे अधिकारी श्री.दिनेश गायकवाड यांनी एस.सी.सी. ४४५/२०१५ व एस.सी.सी ४४३/२०१५ या दोन केसेस दाखल केल्या. में कोर्टामध्ये या याबाबत सुनावणी झाली असता सदर प्रकरणाविषयी पुरावे तपासून आरोपी पाटणी बंधू यांनी गुन्हा केला असल्याचे सिद्ध झाले असून त्यांना में कोर्टाने दोषी ठरवून दोन्ही केस करिता रुपये २० हजार नुकसान भरपाईची रक्कम फिर्यादी समता पतसंस्थेस देण्याचा आदेश दिला आहे. आरोपी तर्फे औरंगाबाद येथील ॲड.शेजवळ यांनी काम पाहिले तर फिर्यादी समता पतसंस्थेतर्फे कोपरगाव येथील ॲड. विजय गवांदे यांनी काम पाहिले. त्यांना वसुली विभागाचे अधिकारी श्री.दिनेश गायकवाड व वसुली अधिकारी श्री.जनार्दन कदम, उपविभागीय अधिकारी श्री.सोपान पठारे यांनी सहाय्य केले.
कर्जदारांनी कोणत्याही पतसंस्थेस दिलेले चेक पास करता यावेत.अन्यथा अशा प्रकारची शिक्षा होऊन तुरुंगवासाची वेळ येऊ शकते याचे भान ठेवावे. त्यामुळे थकीत कर्जदार यांनी वेळेवर थकबाकीचा भरणा करावा व कटू कारवाई टाळावी. तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० व नियम १९६१ मधील कलम १०१, कलम १५६ हे देखील सहकारातील अतिशय कठोर कायदे असल्याचे समता नागरी सहकारी पतसंस्थेचे जनरल मॅनेजर श्री.सचिन भट्टड यांनी सांगितले.