समता पतसंस्थेच्या ग्राहकांना दिली जाणारी प्रामाणिक सेवा ही समताची खरी ओळख – श्री हंबीरराव पाटील, चेअरमन
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
समता पतसंस्थेच्या ग्राहकांना दिली जाणारी प्रामाणिक सेवा ही समताची ओळख – श्री हंबीरराव पाटील,चेअरमन
कोपरगाव : अत्याधुनिक तंत्रज्ञान व सभासदांना तत्पर सेवा देणाऱ्या महाराष्ट्रातील अग्रगण्य समता नागरी सहकारी पतसंस्थेची आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून समताच्या ग्राहक, सभासदांना दिली जाणारी प्रामाणिक सेवा ही समताची खरी ओळख आहे.यामुळे समताची भविष्यातील आर्थिक प्रगती ही होणार असून सभासदांच्या उज्वल भविष्यासाठी फायदेशीर आहे.असे गौरवोद्गार पेठ ता.वाळवा,जि.सांगली तील आत्मशक्ती नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन श्री हंबीरराव पाटील यांनी काढले.
समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयास २० मे २०२२ रोजी पेठ ता.वाळवा,जि.सांगली तील आत्मशक्ती नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन श्री हंबीरराव पाटील,संचालक महादेव पाटील,प्रदीप पाटील,निवास पाटील, रवींद्र पाटील,संजय पाटील,जयवंत जाधव,जनसंपर्क अधिकारी अभिजित पाटील, जनरल मॅनेजर संजय दाभोळे,असि.जनरल मॅनेजर रमेश पाटील,बजरंग माळी आदींनी सदिच्छा भेट दिली
प्रसंगी समता नागरी सहकारी पतसंस्थचे संचालक श्री जितुभाई शहा,श्री संदीप कोयटे,जनरल मॅनेजर श्री सचिन भट्टड यांच्याशी समता पतसंस्थेची सुसज्ज,भव्य इमारत,आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मोबाईल बँकिंग, व्हाऊचरलेस बँकिंग सुविधा, क्यु.आर.कोड,फॉरेन्सिक ऑडीट कंट्रोल रूम,समता रिकव्हरी पॅटर्न, सोनेतारण विभाग, समता महिला बचत गटाच्या माध्यमातून तयार करण्यात येणारी अगरबत्ती,घी बत्ती कापूर,हँडवॉश,उटणे,फुलवाती, समई वाती,अगरबत्ती आणि कापूर यांना एकत्र बांधून तयार करण्यात आलेला गुच्छ,मास्क,पेटीकोट आणि समताज सहकार मिनी मॉल मधील विक्रीसाठी उपलब्ध वस्तूंविषयी चर्चा केली.त्यानंतर संस्थेचे संचालक संदीप कोयटे,पदाधिकारी,अधिकारी, कर्मचारी यांनी सविस्तर माहिती दिली.त्यानंतर समता पतसंस्थेचे संचालक श्री संदीप कोयटे यांच्या हस्ते आत्मशक्ती नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन श्री हंबीरराव पाटील यांचा प्रातिनिधिक स्वरूपात समता महिला बचत गटाने अगरबत्ती व कापूर एकत्र बांधून तयार करण्यात आलेला गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
उपस्थित पदाधिकाऱ्यांनी समता पतसंस्था आणि सहकार उद्योग मंदिराविषयी मिळालेल्या माहितीबद्दल समाधान व्यक्त करत संस्थेचे अधिकारी,कर्मचारी यांनी दिलेली अनमोल माहिती आणि बहुमोल वेळ दिल्याबद्दल आभार मानले आणि समताच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत निरोप घेतला.