समता पतसंस्थेने ज्येष्ठ नागरिकांसाठी उर्वरित आयुष्य आनंदात जगण्यासाठी हा जो उपक्रम घेतला त्याचप्रमाणे इतर संस्थांनी ही या उपक्रमाचा आदर्श घ्यावा – श्री.अशोक देशमुख,पुणे
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
समता पतसंस्थेने ज्येष्ठ नागरिकांसाठी उर्वरित आयुष्य आनंदात जगण्यासाठी हा जो उपक्रम घेतला त्याचप्रमाणे इतर संस्थांनी ही या उपक्रमाचा आदर्श घ्यावा – श्री.अशोक देशमुख,पुणे
कोपरगाव : ज्येष्ठ नागरिक ही राष्ट्रीय संपत्ती असल्यामुळे त्या संपत्तीचे जतन करणे ही त्या कुटुंबातील प्रत्येकाची जबाबदारी असून प्रथम कर्तव्य आहे.तसेच त्या ज्येष्ठ नागरिकांनी ही आपल्या कुटुंबासोबत आपले उर्वरित आयुष्य आनंदाने, सुखाने जगता यावे यासाठी बोलणे,चालणे,हसणे, दानधर्म करणे, दुसऱ्यांच्या आनंदात सहभागी होणे,माफ करणे, योगसाधना करणे,कोणताही विचार न करता पूर्ण झोप घेणे यांसारख्या सात सवयी अंगिकारल्या तर निश्चितच प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाचे आयुष्य हे आनंदात आणि सुखात जाईल.समता पतसंस्था ही महाराष्ट्रातील अशी पतसंस्था आहे की,या पतसंस्थेने ज्येष्ठ नागरिकांचे उर्वरित आयुष्य आनंदी व सुखाने जाण्यासाठी व्याख्यानांचे आयोजन करून त्यांचे स्वागतापासून पासून ते कार्यक्रमाच्या समारोपापर्यंत त्यांची काळजी घेतली.त्यामुळे समताचे हे कार्य सामाजिक क्षेत्रात देखील महत्त्वपूर्ण असून प्रशंसनीय आहे.समता पतसंस्थेने असा उपक्रम घेऊन एक आदर्श निर्माण केला असून इतर संस्थांनी ही समताचा आदर्श घ्यावा.असे प्रतिपादन पुणे येथील सुप्रसिद्ध व्याख्याते श्री.अशोक देशमुख यांनी केले.
समता पतसंस्थेने आयोजित केलेल्या व्याख्यानाला ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद – काका कोयटे
समता नागरी सहकारी पतसंस्थेने जेष्ठ नागरिकांसाठी ‘आनंदी जीवन कसे जगावे या विषयावर पुणे येथील सुप्रसिध्द व्याख्याते श्री अशोक देशमुख तर आपले आरोग्य चांगले राखण्यासाठी संतुलित आहार कसा घ्यावा’ या विषयावर कोपरगाव येथील सुप्रसिध्द डॉ.अभिजित आचार्य यांची व्याख्याने सोमवार दि.११ जुलै रोजी माऊली संकुल,अहमदनगर, मंगळवार दि.१२ जुलै रोजी गोविंदराव आदिक सभागृह,श्रीरामपूर तर बुधवार दि.१३ जुलै रोजी कृष्णाई मंगल कार्यालय,कोपरगाव व महात्मा फुले नाट्य गृह,येवला या ठिकाणी आयोजित केली होती.त्या प्रसंगी ते बोलत होते.
या व्याख्याना प्रसंगी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी टाळ्या,हशा, शिट्ट्या तसेच नृत्य करत प्रत्येक ठिकाणच्या व्याख्यानाचा आस्वाद घेत आनंद घेतला.
डॉ.अभिजीत आचार्य ज्येष्ठ नागरिकांनी आहार कसा घ्यावा या विषयावर मार्गदर्शन करताना म्हणाले की ज्येष्ठ नागरिकांनी एका वेळेस चार पोळ्या खाण्याऐवजी चार वेळेस चार पोळ्या खाव्यात ज्येष्ठ नागरिकांनी ३० ते ४० मिनिटे चालावे.किमान २४ तासात ४ लिटर पाणी पिलेच पाहिजे.आपण आयुष्यभर कमावलेली संपत्ती शेवटपर्यंत आपल्याच नावावर ठेवावी आपल्या वारसांना ती देऊ नये.
प्रसंगी समता पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे म्हणाले की,ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकांचे कर्तव्य आहे.याच कर्तव्य भावनेने समता पतसंस्थेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष फायदेशीर योजना अंमलात आणल्या असून समता त्यांच्या ठेवीवर अर्धा टक्का व्याज अधिक देणार आहे.ज्येष्ठ नागरिकांनी आयुष्यभर केलेली बचत किंवा सेवानिवृत्ती प्रसंगी मिळालेली रक्कम गुंतवणूक करून त्यावर मिळणाऱ्या व्याजातून ज्येष्ठ नागरिकांना समता मोठा हातभार लावत असते.तसेच वयोमानानुसार त्यांचे उर्वरित आयुष्य आनंदाने जगता यावे आणि उतरत्या वयानुसार आरोग्यावर होणाऱ्या परिणामांची व त्यावर वेगवेगळे उपचार कसे करावे यासाठी या विशेष उपक्रमाचे आयोजन समताने केले होते.या व्याख्यानांना ज्येष्ठ नागरिकांनी हजारोच्या संख्येने उत्स्फूर्त प्रतिसाद देत आनंद घेतला.
तसेच ज्येष्ठ अर्थतज्ञ श्री अनिल बोकील व श्री विजय दबडगावकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय स्तरावरील अर्थक्रांती या संघटनेच्या वतीने भारतातील ज्येष्ठ नागरिकांना दरमहा १० हजार निवृत्ती वेतन मिळावे, शासकीय कार्यालयात सन्मानाची वागणूक मिळावी तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी ॲट्रॉसिटी सारखा कायदा तयार करावा आणि ज्येष्ठ नागरिकांना एक राष्ट्रीय संपत्ती घोषित करण्यात यावे.या मागण्या मंजूर करण्यात याव्यात यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याची मोहीम देशभर चालू आहे.
व्याख्यानानंतर मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ नागरिक म्हणाले की. या दोन तासाच्या व्याख्यानामध्ये आम्ही कधीही आयुष्यात एवढे हसलो नाही तेवढे समता पतसंस्थेने घेतलेल्या या व्याख्यानाच्या अनुषंगाने आम्हाला हसायला मिळाले.काकांनी आम्हाला या अनुषंगाने नुसते हसवले च नाही तर व्यायाम करत नाचवले ही त्यामुळे समताच्या सेवा भावाने आम्ही सुखावलो आहोत.
प्रसंगी व्याख्याते श्री.अशोक देशमुख,डॉ.अभिजीत आचार्य तसेच ज्येष्ठ नागरिक सेवा मंचचे कार्याध्यक्ष श्री विजय बंब,ज्येष्ठ कोपरगाव तालुका पेन्शनरचे ज्येष्ठ सल्लागार श्री.मन्साराम पाटील, प्रसिद्ध उद्योजक श्री. कैलासशेठ ठोळे, गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांचा सत्कार समता पतसंस्थेचे चेअरमन काका कोयटे यांच्या हस्ते करण्यात आला तर जेष्ठ नागरिक महिला समितीच्या अध्यक्षा रजनीताई गुजराथी, श्रेष्ठ नागरिक मित्र मंडळाच्या अध्यक्ष पुष्पलता सुतार यांचा सत्कार समता महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ सुहासिनी कोयटे यांच्या हस्ते करण्यात आला तर कोपरगाव तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्राबरोबरच क्रीडा क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आचार्य कुटुंबाचा सत्कार देखील समता पतसंस्थेच्या वतीने करण्यात आला.डॉ.अभिजीत आचार्य यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनशैलीवर होणाऱ्या परिणामांचा आणि त्यावर उपाय योजना कशा कराव्यात. याविषयी चित्रफितीच्या माध्यमातून अनमोल मार्गदर्शन केले.
प्रसंगी अहमदनगर शहरातील श्री रमेश गवळी भूषणनगर, श्री आदिनाथ जोशी सावेडी,श्री तात्याबा दरेकर सारसनगर, श्री पोपट नगरे भिंगार, श्री के.डी.खान्देशी आगरकर मळा आदी भागातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच ए.डी.सी.सी. बँकेचे माजी संचालक श्री आर.डी.मंत्री, सौ निर्मला होनराव उपस्थिती होते. श्रीरामपुर येथे अहमदनगर जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष श्री.रावसाहेब पवार,ज्येष्ठ नागरिक आनंद मेळाव्याचे अध्यक्ष श्री. लक्ष्मणराव निकम, श्रीरामपूर तालुका पेन्शनर्स असोसिएशन चे अध्यक्ष श्री.के.एल. खाडे तर कोपरगाव येथे डॉ.गोवर्धन हुसळे,श्री.चंपालाल ठोळे येवला येथे श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री.राजेंद्र आहेर,श्रीराम ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री रावसाहेब दाभाडे,श्रीराम ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव श्री.कृष्णा शिंदे,श्री.राजेंद्र शिंगी यांची प्रमुख उपस्थिती होती.समता पतसंस्थेचे जनरल मॅनेजर श्री सचिन भट्टड,मुख्य कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व उपस्थितांचे आभार संस्थेचे ठेवी विभाग प्रमुख श्री संजय पारखे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्य कार्यालयाचे अधिकारी कोपरगाव, श्रीरामपूर,अहमदनगर,येवला शाखेचे शाखाधिकारी,कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.